शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

रहिमतपूरचा पंधरा वायरमनांवर ३७ जणांच्या कामाचा लोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:54 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रहिमतपूर उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या पंधरा वायरमनांवर अतिरिक्त ३७ वायरमनच्या कामाचा लोड लादण्यात आला आहे.

ठळक मुद्देउपविभाग कार्यालयातील प्रकार : उपकार्यकारी अभियंत्यांसह कनिष्ठ अभियंत्यांचे पदही रिक्त

रहिमतपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रहिमतपूर उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या पंधरा वायरमनांवर अतिरिक्त ३७ वायरमनच्या कामाचा लोड लादण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित वायरमन तणावाखाली कामकाज करत आहेत. दरम्यान, उपविभागाचे प्रमुख असलेले उपकार्यकारी अभियंत्यांसह कनिष्ठ अभियंत्यांचे पदही सुमारे वर्षभरापासून रिक्त आहे. त्यामुळे अतिरिक्त कामकाज पाहणारे कर्मचारीही ‘हाय होल्टेज’ तणावाखाली आहेत.

वीज वितरणच्या रहिमतपूर उपविभाग कार्यालयांतर्गत परिसरातील सुमारे ४१ गावांत कामकाज चालते. घरगुती वीज कनेक्शन, शेतीपंप वीज कनेक्शन यासह आदी विविध काम दररोज नियमितपणे सुरू असतात. याबरोबरच पावसामुळे, अपघातामुळे तसेच काही कारणामुळे नादुरुस्त झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम कर्मचारी करत असतात. रहिमतपूर शहरासह परिसरातील ४१ गावांतील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी वायरमन तांत्रिक कर्मचारी यांची संख्या पुरेशी असणे गरजेचे असते. मात्र अत्यंत अल्प कर्मचाऱ्यांच्या बळावर सध्या हे कामकाज सुरू आहे.

रहिमतपूर शहर परिसरासाठी १७ वायरमनची पदे मंजूर आहेत. मात्र सध्या केवळ ४ वायरमन उपलब्ध असून, १७ पदे रिक्त आहेत. रहिमतपूर ग्रामीण परिसरासाठी १३ वायरमनची पदे मंजूर आहेत. मात्र ५ वायरमन उपलब्ध असून, ८ पदे रिक्त आहेत. वाठार किरोली परिसरासाठी वायरमनची ११ पदे मंजूर असून, केवळ २ वायरमन उपलब्ध आहेत. या ठिकाणी ९ पदे रिक्त आहेत. तारगाव परिसरासाठी वायरमनची ११ पदे मंजूर आहेत. मात्र ४ वायरमन उपलब्ध असून, ७ पदे रिक्त आहेत.उपविभागात उपलब्ध असलेल्या पंधरा वायरमनच्या अंगावर ३७ वायरमनच्या कामाचा लोड दिला आहे. अतिरिक्त कामाच्या लोडमुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करत आहेत.

अनेकदा अपुºया कर्मचाºयांच्या संख्येमुळे ज्या ठिकाणी दोन कर्मचाºयांची गरज आहे. त्या ठिकाणी धोका पत्करून एकच कर्मचारी काम करताना दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी सचिन फाळके नावाचे वायरमन यांचा शॉक लागून मृत्यू झाला. विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करताना कर्मचाºयाचा जीव वाचला असता. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून वीज वितरणच्या अधिकाºयांनी तातडीने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी कर्मचाºयांसह नागरिकांतून होत आहे.रिक्त जागा भरणे गरजेचे ....रहिमतपूर उपविभाग कार्यालयाचे प्रमुख असलेले उपकार्यकारी अभियंता पद गेल्या सात महिन्यांपासून रिक्त आहे. सहायक अभियंता यांच्याकडे उपकार्यकारी अभियंता म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना दोन टेबलची कामे करावी लागत आहेत. कनिष्ठ अभियंत्यांना त्यांच्या कामासह रहिमतपूर ग्रामीण शाखेचे पूर्ण कामकाज पाहावे लागत आहे. हे पद सप्टेंबर २०१६ पासून रिक्त आहे. तसेच वाठार किरोली येथील गुण नियंत्रण कक्षाची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यांवर देण्यात आली आहे. त्यांनाही अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. जिल्हा कार्यालयाकडे या रिक्त जागा तत्काळ भरण्यात याव्यात, अशी अनेकदा मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण