शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

रहिमतपूरचा पंधरा वायरमनांवर ३७ जणांच्या कामाचा लोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:54 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रहिमतपूर उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या पंधरा वायरमनांवर अतिरिक्त ३७ वायरमनच्या कामाचा लोड लादण्यात आला आहे.

ठळक मुद्देउपविभाग कार्यालयातील प्रकार : उपकार्यकारी अभियंत्यांसह कनिष्ठ अभियंत्यांचे पदही रिक्त

रहिमतपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रहिमतपूर उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या पंधरा वायरमनांवर अतिरिक्त ३७ वायरमनच्या कामाचा लोड लादण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित वायरमन तणावाखाली कामकाज करत आहेत. दरम्यान, उपविभागाचे प्रमुख असलेले उपकार्यकारी अभियंत्यांसह कनिष्ठ अभियंत्यांचे पदही सुमारे वर्षभरापासून रिक्त आहे. त्यामुळे अतिरिक्त कामकाज पाहणारे कर्मचारीही ‘हाय होल्टेज’ तणावाखाली आहेत.

वीज वितरणच्या रहिमतपूर उपविभाग कार्यालयांतर्गत परिसरातील सुमारे ४१ गावांत कामकाज चालते. घरगुती वीज कनेक्शन, शेतीपंप वीज कनेक्शन यासह आदी विविध काम दररोज नियमितपणे सुरू असतात. याबरोबरच पावसामुळे, अपघातामुळे तसेच काही कारणामुळे नादुरुस्त झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम कर्मचारी करत असतात. रहिमतपूर शहरासह परिसरातील ४१ गावांतील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी वायरमन तांत्रिक कर्मचारी यांची संख्या पुरेशी असणे गरजेचे असते. मात्र अत्यंत अल्प कर्मचाऱ्यांच्या बळावर सध्या हे कामकाज सुरू आहे.

रहिमतपूर शहर परिसरासाठी १७ वायरमनची पदे मंजूर आहेत. मात्र सध्या केवळ ४ वायरमन उपलब्ध असून, १७ पदे रिक्त आहेत. रहिमतपूर ग्रामीण परिसरासाठी १३ वायरमनची पदे मंजूर आहेत. मात्र ५ वायरमन उपलब्ध असून, ८ पदे रिक्त आहेत. वाठार किरोली परिसरासाठी वायरमनची ११ पदे मंजूर असून, केवळ २ वायरमन उपलब्ध आहेत. या ठिकाणी ९ पदे रिक्त आहेत. तारगाव परिसरासाठी वायरमनची ११ पदे मंजूर आहेत. मात्र ४ वायरमन उपलब्ध असून, ७ पदे रिक्त आहेत.उपविभागात उपलब्ध असलेल्या पंधरा वायरमनच्या अंगावर ३७ वायरमनच्या कामाचा लोड दिला आहे. अतिरिक्त कामाच्या लोडमुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करत आहेत.

अनेकदा अपुºया कर्मचाºयांच्या संख्येमुळे ज्या ठिकाणी दोन कर्मचाºयांची गरज आहे. त्या ठिकाणी धोका पत्करून एकच कर्मचारी काम करताना दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी सचिन फाळके नावाचे वायरमन यांचा शॉक लागून मृत्यू झाला. विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करताना कर्मचाºयाचा जीव वाचला असता. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून वीज वितरणच्या अधिकाºयांनी तातडीने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी कर्मचाºयांसह नागरिकांतून होत आहे.रिक्त जागा भरणे गरजेचे ....रहिमतपूर उपविभाग कार्यालयाचे प्रमुख असलेले उपकार्यकारी अभियंता पद गेल्या सात महिन्यांपासून रिक्त आहे. सहायक अभियंता यांच्याकडे उपकार्यकारी अभियंता म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना दोन टेबलची कामे करावी लागत आहेत. कनिष्ठ अभियंत्यांना त्यांच्या कामासह रहिमतपूर ग्रामीण शाखेचे पूर्ण कामकाज पाहावे लागत आहे. हे पद सप्टेंबर २०१६ पासून रिक्त आहे. तसेच वाठार किरोली येथील गुण नियंत्रण कक्षाची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यांवर देण्यात आली आहे. त्यांनाही अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. जिल्हा कार्यालयाकडे या रिक्त जागा तत्काळ भरण्यात याव्यात, अशी अनेकदा मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण